खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. अठरा जून उगवला तो ________________.
२. लोकांची उत्सुकता __________________.
३. गोव्याच्या विविध भागांतून लोक ___________________.
४. लोहिया टॅक्सीतून सभास्थानी यायला निघतील आणि मग ते सरळ आपल्या सापळ्यात सापडतील असा ________________.
५. त्यांना तेथे कोणी ओळखणार नाही याची ________________________.
६. त्या दिवशी दुपारपासून __________________________.
७. रिपब्लिक हॉटेलमधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे महत्वाचे काम ________________________.
८. नियोजित सभास्थान सुमारे _______________________.
९. धवल पोषाखातील डॉ. लोहियांना आणि ________________________.
१०. जणू ती पावसाची सर, __________________________.
११. मिरांद हा ‘मिश्तीस’ ________________________.
१२. मडगाव शहराचाच नव्हे तर _____________________.
१३. कॅप्टन मिरांदने _________________.
१४. लक्ष्मीदास बोरकरांनी _____________________.
१५. भाषणाचे कागद हस्तगत करण्याचेही भान ____________________.
१६. लवंदेच्या जागी दुसरे सत्याग्रही एकेक करुन उभे राहिले आणि ___________________.
१७. त्या दिवशी मडगावात सुमारे _____________________.
१८. साठ स्त्रियांचा मोर्चा ___________________.
१९. सगळ्या स्त्रिया ____________________.
२०. ‘कुमारी कीर्तनीला सोडा _______________________.
२१. पुरुषोत्तम काकोडकरांनी त्यांच्या भाषणाचा ___________________.
उत्तर
१. अ) अठरा जून उगवला तो मंगळवार होता.
२. इ) लोकांची उत्सुकता शिगेस पोचली होती.
३. इ) गोव्याच्या विविध भागांतून लोक मडगावात जमत होते.
४. आ) लोहिया टॅक्सीतून सभास्थानी यायला निघतील आणि मग ते सरळ आपल्या सापळ्यात सापडतील असा पोलीस अधिकाऱ्यांना समज होता.
५. अ) त्यांना तेथे कोणी ओळखणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घेतली होती.
६. ई) त्या दिवशी दुपारपासून पाऊस जोरात पडत होता.
७. इ) रिपब्लिक हॉटेलमधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे महत्वाचे काम लक्ष्मीदास बोरकर या तरुणाकडे सोपविण्यात आले होते.
८. आ) नियोजित सभास्थान सुमारे पंचवीस फूट अंतरावर होते.
९. अ) धवल पोषाखातील डॉ. लोहियांना आणि डॉ. मिनेझिसना लोकानी ओळखले.
१०. इ) जणू ती पावसाची सर आनंदाची बरसात होती.
११. अ) मिरांद हा ‘मिश्तीस’ जमातीतला होता.
१२. अ) मडगाव शहराचाच नव्हे तर सासष्टी तालुक्याचा तो अँडमिनिस्ट्रेटर होता.
१३. ई) कॅप्टन मिरांदने पोर्तुगीजमधून विचारले होते.
१४. अ) लक्ष्मीदास बोरकरांनी दुभाष्याचे काम केले.
१५. आ) भाषणाचे कागद हस्तगत करण्याचेही भान कॅप्टन मिरांदला राहिले नव्हते.
१६. ई) लवंदेच्या जागी दुसरे सत्याग्रही एकेक करुन उभे राहिले आणि भाषण देऊ लागले.
१७. इ) त्या दिवशी मडगावात सुमारे दीडशे देशभक्तांची धरपकड झाला.
१८. इ) साठ स्त्रियांचा मोर्चा पोलीसठाण्यावर गेला. सगळ्या स्त्रिया कुलीन घराण्यांतील होत्या.
१९. अ) सगळ्या स्त्रिया कुलीन घराण्यांतील होत्या.
२०. इ) ‘कुमारी कीर्तनीला सोडा नाही तर आम्हांलाही पकडा’
२१. आ) पुरुषोत्तम काकोडकरांनी त्यांच्या भाषणाचा कोंकणीत अनुवाद करुन लोकांना सांगितला.